Sunday, 31 August 2014

मित्रांनो...
बाबासाहेबांचे हे पत्र वाचून, तुमच्या डोळ्यातून पाणी नाही आले तर , मग बोला....
-----------------------------------------------------------------
रमा.... !

कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.


दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली.


मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.


आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.


रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत.


मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे.


आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.


मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा !


मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.


खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.


माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.


रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.


रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.

सर्वांस कुशल सांग.....!
कळावे,

तुझा.... भीमराव.....!
लंडन, ३० डिसेंबर १९३०

(यशवंत मनोहर यांच्या 'रमाई' या पुस्तकातून साभार)

Thursday, 28 August 2014

म्हणे धर्म ग्रंथांची चिकित्सा करायाची नाही.


 ब्राम्हनानी या देशात ज्या पोथ्या लिहुन ठेवल्या .त्यात सर्व आवास्तव आतिरंजित आनि काल्पनिक मसाला लेवलेल्या कथा सापडतात.ह्या कथांची जर समीक्षा करायचे म्हटले तर तोंडात आळ्या पडतात म्हणे.
हल्ली बर्याच जणांच्या भावनाही दुखु लागल्या.बरे ब्राम्हणांपेक्षा आमच्याच चोमड्या लोकाना हे सहण होइना.जणु काय धर्मग्रंथ लिहिनारे ब्राम्हण यांचे नाजायज बाप होते .
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
तरीही आपण गणेश जन्माच्य कथेची समीक्षा करुच
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
येकदा पार्वती आंघोळीला गेली आनि तिने .दरवाज्यावर पहारेकरी म्हनुन आंगावरल्या मळाचा गणपती बसवला.

🔶प्रश्न
1)काय मळाचा बनवलेला गणपती जिवंत होवु शकतो .
2)बरे पार्वती येवढी घाणेरडी होती का की जिच्या आंगावर येवढा मळ निघाला.
3)पार्वतीच्या बाथरुमला दरवाजे नव्हते काय ?
4)दरव्याज्यात उभे करायला कुनि दासदास्या नव्हत्या काय ?

आनि आपल्या बायकोला भेटायला शिव आला .तेव्हा गणपतीणे शिवाला बाथरुम मधे जाउ देन्यास मज्जाव केला.
मला आडवनारा तु कोन हे शिवाने विचारले .
मी पार्वतीपुत्र आहे गणपतीने सांगितले.मग मला कसे माहिती नाही आसे शिव म्हनाला.प्रंचंड भांडणे झाली ,युद्ध झाले.
 या युद्धात गणपती मारला गेला.

🔶प्रश्न
1)शिवाला आसे कोनते कोम होते की तो चक्क बायकोला बाथरुम मधे भेटायला गेला ?
शिव थोडाही थांबु शकत नव्हता का ?ज्यामुळे तो गणपतीशी युद्ध करायला तयार झाला ?होल ,बेडरुम सोडुन बायकोला बाथरुम मधे भेटन्याची कारणे धर्मग्रंथ सागतिल काय ?
2)हा गणपती माझा मुलगा आहे हे शिवाला माहिती नव्हते .मग तो नाजायज होता की काय ?
3)बाप मुलाला येकमेकांची ओळख कशी नव्हती.?शिव तर तिन डोळ्याची देवता.
4)बाहेर येवढी मोठी भांडणे चालु आहेत हे पार्वतीला न कळायला ती काय हेडफोन लावुन आंघोळ करत होती की शावर चालु आवाज नाही आला.
5) मुलाचे मुंडके उडवे पर्यंत पर्वती येवढ्यावेळ आंघोळ करत होती काय ?

पार्वती बाहेर आली .पहाते तर काय मुलगा मारला गेलाय .ती शिवाला भांडली .माझा मुलगा जिवंत पाहिजे म्हनाली.शिवाने त्रिशुल फेकला .आणि पहिला प्राणि जो दिसेल त्याचे मुंडके आनुन गणपतिला आनुन बसवले.

🔶प्रश्न
1) गणपती जिवंतच करायचा होता तर बाजुला पडलेले पहिलेच मुंडके का नाहि बसवले गेले ?
2) माणसाला हत्तिचे मुंडके बसेल काय ?
3)द्विपाद प्राण्याला चतुस्पाद प्राण्याचे मुंडके बसते .हे विन्यान मान्य करेल काय ?डोक्टर मान्य करतिल काय ??


मित्रान्नो ही शिव पार्वती आनि गणपतीची सरळ सरळ बदनामी आहे.जी ब्राम्हणान्नी केली..हा ब्राम्हणी खोटेपणा उघड करा
?तर्क करा .सत्य समजुन घ्या.हे av

Thursday, 14 August 2014

!!  युगारंभ  !!

इरावती कर्वे यान्नी युगांत लिहीले .हा शब्द नकारात्म आर्थाचा आहे.म्हंजे युगाचा अंत .त्यांच्या द्रस्टिने तो युगांतच आहे.पन आमच्या द्रस्टीने तो युगारंभ आहे.ब्राम्हणीयुग संपुन आता कुठे आब्राम्हणी युगाची पहाट होत आहे.
" होय हा युगारंभच आहे "
डो.बाबासाहेब आंबेडकर यान्ना आपेक्षीत आसलेला समता ,स्वतंत्रता ,आनि न्याय यावर आधारीत आदर्ष समाज आनि रास्ट्र निर्माण करने हे आमच्या आमच्या युगात करावयाचे बाकी आसलेले काम आहे.

संविधानाच्या रुपाने आमचा युगारंभ झाला.पन इथे परत प्रतिकारंती करण्याची सर्व तयारी ब्राम्हण करुन बसलेत .
म्हनुन मी लिहीतोय.लिहिनार लिहिल.

मी नितिन सावंत ,
या देशाचा भुमीपुत्र या नात्याने ,भारतभुची हाजारो वर्षाची मी व्यथा मांडनार आहे..
आमच्यावर झालेले  धार्मीक ,सांस्क्रतीक ,मानसिक आन्याय आत्याचार.